दिवस गेल्यानंतर घ्यावयाची काळजी
पाळी चुकल्यानंतर प्रथम डॉक्टरकडून तपासणी करून दिवस (बाळाच्या भुमिकेतून आईचे संगोपन !) गेल्याची खात्री करून घेणं आवश्यक ठरतं. म्हणजे दिवस गेल्यानंतरच्या आहार विहार, कष्टाची कामं, पती पत्नी संबंध या सारख्या गोष्टीविषयी सल्ला घेता येतो. गरोदरपणात वेळोवेळी डॉक्टरकडून तपासणी करून घेणं आवश्यक आहे.
ताबडतोब डॉक्टरी सल्ला केव्हा घ्यावा ?
खेड्यतील स्त्रियांसाठी
सर्व खेड्यांमध्ये डॉक्टरची सोय होणं कठीण असतं. त्यामुळॆ गरोदरपणी वेळोवेळी तपासणी करून घेणं अवघड जातं. तरीसुद्धा गरोदरपणी विशेषता ७ व्या महिन्यानंतर दोनदा किंवा निदान एकदातरी डॉक्टरकडून तपासणी करून घ्यावी. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, कॉटेज हॉस्पिटल अशा दवाखान्याची सोय निदान तालुक्याच्या गावी तरी सामान्यतः असते. यामुळे बाळंतपण घरी होणे शक्य आहे का ? याचा अंदाज येतो. तसेच शरीरामध्ये असणाऱ्या रक्ताचं प्रमाण, रक्ताचा गट, लघवी इत्यादी तपासण्या करून घेणं आवश्यक आहे.
पाळी चुकल्यानंतर प्रथम डॉक्टरकडून तपासणी करून दिवस (बाळाच्या भुमिकेतून आईचे संगोपन !) गेल्याची खात्री करून घेणं आवश्यक ठरतं. म्हणजे दिवस गेल्यानंतरच्या आहार विहार, कष्टाची कामं, पती पत्नी संबंध या सारख्या गोष्टीविषयी सल्ला घेता येतो. गरोदरपणात वेळोवेळी डॉक्टरकडून तपासणी करून घेणं आवश्यक आहे.
ताबडतोब डॉक्टरी सल्ला केव्हा घ्यावा ?
- जास्त प्रमाणात उलट्या होणं.
- चक्कर येणं
- फार अशक्तपणा वाटणं.
- अंगावर पांढरे पाणी किंवा लाल जाणं.
- पोटात दुखणं
- कंबर एकसारखी दुखणं.
- लघवीचा त्रास होणं.
खेड्यतील स्त्रियांसाठी
सर्व खेड्यांमध्ये डॉक्टरची सोय होणं कठीण असतं. त्यामुळॆ गरोदरपणी वेळोवेळी तपासणी करून घेणं अवघड जातं. तरीसुद्धा गरोदरपणी विशेषता ७ व्या महिन्यानंतर दोनदा किंवा निदान एकदातरी डॉक्टरकडून तपासणी करून घ्यावी. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, कॉटेज हॉस्पिटल अशा दवाखान्याची सोय निदान तालुक्याच्या गावी तरी सामान्यतः असते. यामुळे बाळंतपण घरी होणे शक्य आहे का ? याचा अंदाज येतो. तसेच शरीरामध्ये असणाऱ्या रक्ताचं प्रमाण, रक्ताचा गट, लघवी इत्यादी तपासण्या करून घेणं आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment