बाळंतपणातील आहार.
अॅडमिट होण्यासाठी जाण्याच्याचेळी पोट भरून जड आहार घेऊ नये. याउलट हलका आहार, पातळ पदार्थ घ्यावेत. कळा चालू असताना बऱ्याच वेळी उलटी होण्याचा संभव असतो. तसेच भूल देण्याचा प्रसंग आलाच तर पोटभर खाल्लेलं असल्यास उलटी होऊन खूपच त्रास होतो.
बाळंतपणाच्या वेळची काळजी
बाळंतपणात माय अंगात टाके पडणे हेही नॉर्मल बाळंतपणच आहे. टाके पडले म्हणून अजिबात हालचाल न करणंही चुक आहे. बाळंतपण हा रोग नव्हे बाळंतपणानंतर विश्रांतीची आवश्यकता असते. एक चांगली झोप झाल्यावर जरुर हिंडूफिरू लागावे.
बाळाला अंगावर पाजणे
बाळंतपणानंतर सामान्यपणे ६ तासांनी बाळाला अंगावर पाजायला घ्यावे. त्यांनी खूपच फायदे होतात. रोगप्रतिकारक शक्ती, प्रथिने इ. गोष्टी पहिल्या दुधातून बाळाला पोहचतात. तसेच भरपूर दूध मातेस येणेसाठीही मदत होते. बाळाला अंगावर पाजणेचे आधी व नंतर स्तन धुऊन स्वच्छ करावीत. त्यात दूध साठून राहात असेल तर हातांनी पिळून काढून टाकावे. बाळंपणानंतर १० दिवस सोयर पाळणेची प्रथा आहे. खरं म्हणजे यामागील उद्देश बाळतीणीस पूर्ण विश्रांती व बाळास फार लोकांनी हाताळू नये हा असावा. ह्या दोन्ही गोष्टी हॉस्पिटल मध्ये बाळंतपण झाले असले तरीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. फार लोकांनी बाळ बघणेसाठी येऊ नये. विशेषतः लहान मुलांना यात खूपच उत्साह दिसून येतो. पण यामुळे मातेची विश्रांती नीट होत नाहीच, शिवाय बाळाला फार हाताळले जाते व सांसर्गिक रोगांच्या जंतूपासून बाळाला इजा होण्याचा संभव वाढतो.
अॅडमिट होण्यासाठी जाण्याच्याचेळी पोट भरून जड आहार घेऊ नये. याउलट हलका आहार, पातळ पदार्थ घ्यावेत. कळा चालू असताना बऱ्याच वेळी उलटी होण्याचा संभव असतो. तसेच भूल देण्याचा प्रसंग आलाच तर पोटभर खाल्लेलं असल्यास उलटी होऊन खूपच त्रास होतो.
बाळंतपणाच्या वेळची काळजी
- बाळंतपणाच्या वेळी स्वतः शांत राहून डॉक्टरना तपासणीच्या वेळी सहकार्य करावं. तपासणी करतांना, एनिमा देताना किंवा प्रत्येक कळेबरोबर थोडाबहुत त्रास हा प्रत्येक स्त्रीस होतच असतो. पण अशावेळी आरडाओरडा करून कोणताच फायदा न होता त्यातच शक्ती कामी लागते व प्रत्यक्ष कळा देणेच्या वेळी शक्ती उरत नाही.
- बाळंतपणाच्या प्रथम अवस्थेत कळा देणे इष्ट नसते. त्यामुळे श्रम तर वाया जातातच, पण पुढे गर्भाशयाची पिशवी योनीतून बाहेर येणेची शक्यता वाढते. म्हणून डॉक्टरनी सांगेपर्यंत कळा घेऊन जोर करू नये. तसंच उकीडवं बसून किंवा उभ्याने कळा घेऊ नयेत. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे पाठीवर जोपून पाय पोटाशी घेऊन कळा घ्याव्यात.
- बाळंतपणात वरचेवर थोडे थोडे पाणी, चहा, सरबत अशी द्रव्ये घ्यावीत. तसेच वरचेवर लघवीला जाऊन मूत्राशय रिकामे ठेवावे. म्हणजे बाळ नीट येतात व बाळंतपण जास्त सोपे होते.
- बाळंतपणाच्या वेळी नेहमी स्वच्छ पॅड घ्यावे.
- बाळाच्या जन्मानंतर लगेच मुलाचे लिंग समजावून घ्यायचा प्रयत्न करू नये. ही काळजी विशेषतः पूर्वीच्या २/३ मुली असणाऱ्यांनी घ्यायची आहे. परत या वेळेही मुलगीच जन्माला आलेली असेल तर एखादे वेळेस लगेच मानसिक ताण पडण्याचा संभव असतो.
- बाळाच्या जन्मानंतर सामान्यपणे १० मिनिटापर्यंत वार बाहेर येते. परंतु तशी न आल्यास ती ओढून काढणेचा प्रयत्न करू नये. ही काळजी विशेषतः घरी बाळंतपण होताना घेणे आवश्यक आहे.
बाळंतपणात माय अंगात टाके पडणे हेही नॉर्मल बाळंतपणच आहे. टाके पडले म्हणून अजिबात हालचाल न करणंही चुक आहे. बाळंतपण हा रोग नव्हे बाळंतपणानंतर विश्रांतीची आवश्यकता असते. एक चांगली झोप झाल्यावर जरुर हिंडूफिरू लागावे.
बाळाला अंगावर पाजणे
बाळंतपणानंतर सामान्यपणे ६ तासांनी बाळाला अंगावर पाजायला घ्यावे. त्यांनी खूपच फायदे होतात. रोगप्रतिकारक शक्ती, प्रथिने इ. गोष्टी पहिल्या दुधातून बाळाला पोहचतात. तसेच भरपूर दूध मातेस येणेसाठीही मदत होते. बाळाला अंगावर पाजणेचे आधी व नंतर स्तन धुऊन स्वच्छ करावीत. त्यात दूध साठून राहात असेल तर हातांनी पिळून काढून टाकावे. बाळंपणानंतर १० दिवस सोयर पाळणेची प्रथा आहे. खरं म्हणजे यामागील उद्देश बाळतीणीस पूर्ण विश्रांती व बाळास फार लोकांनी हाताळू नये हा असावा. ह्या दोन्ही गोष्टी हॉस्पिटल मध्ये बाळंतपण झाले असले तरीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. फार लोकांनी बाळ बघणेसाठी येऊ नये. विशेषतः लहान मुलांना यात खूपच उत्साह दिसून येतो. पण यामुळे मातेची विश्रांती नीट होत नाहीच, शिवाय बाळाला फार हाताळले जाते व सांसर्गिक रोगांच्या जंतूपासून बाळाला इजा होण्याचा संभव वाढतो.
No comments:
Post a Comment