नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Friday 29 December 2017

मग, आम्ही का नाही

आईचे प्रेम आणि बापाचे छत्र नसलेला 'बराक'
नावाचा पोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो
पेट्रोलपंपा वर काम करणारे 'धीरुभाई' करोड़ोंचे
साम्राज्य उभे करतात...
कॉलेजच्या प्रवेश फी साठी पैसे नाहीत म्हणून
बहिणीचे दागिने गहाण ठेवणारे 'अब्दुल कलाम'
राष्ट्रपती पदापर्यंत जातात
जातीय व्यवस्थेमुळे अपमान सहन करणारे डॉ.
बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्य घटना लिहितात.
रोजगार हमीच्या कामावर जाणारे आर.आर.पाटील
राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री होतात.
सत्तावीस वर्ष तुरुंगात काढणारे 'नेल्सन मंडेला'
जगाला प्रेम शिकवतात.
कुठलीही शारीरिक हालचाल न करू शकणारे
'स्टीफन हॉकिंग' जग हलवणारे संशोधन करतात...
"शुन्यातून प्रवास करत माणसे प्रेरणादायी जग
निर्माण करतात..."
मग, आम्ही का नाही???"
माणूस किती किंमतीचे कपडे
वापरतो यावरून त्याची किंमत
होत नसते ,
परंतु , तो इतरांची किती किंमत
करतो यावरून त्याची किंमत
ठरत असते .
पक्षी जेंव्हा जिवंत असतो तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो पण जेंव्हा पक्षी मरण पावतो तेंव्हा तेच कीड़े मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.
कोणाचा अपमानही करू नका आणि कोणाला कमी लेखु नका.

तुम्ही खुप शक्तिशाली असाल पण वेळ ही तुमच्या पेक्षाही शक्तिशाली आहे

. एका झाडापासून लाखो माचीसच्या काड्या बनवता येतात पण एक माचीसची काडी लाखो झाडे जाळून खाक करू शकते.
कोणी कितीही महान झाला असेल पण निसर्ग कोणाला कधीच महान बनन्याचा क्षण देत नाही.

कंठ दिला कोकीळेला पण रूप काढून घेतले.
रूप दिले मोराला पण ईच्छा काढून घेतली.
ईच्छा दिली मानवाला पण संतोष काढून घेतला.
दिला संतोष संतांना पण संसार काढून घेतला.

हे मानवा.... कधी करू नको अहंकार स्वतःवर तुझ्या माझ्या सारख्या किती जणाना मातीतून घडवल आणि मातीतच घातल.

लग्नाच्या वरातीत लोकं पुढे नाचत असतात, तर अंत्ययात्रेला मागुन चालत असतात.
याचाच अर्थ असा की लोकं सुखात पुढेपुढे नाचत असतात आणि दुःखात मागुन चालत असतात.
लोक त्यांच्या रितीने पुढेमागे होतच असतात. त्यामुळे लोकं आपल्या पुढे असली काय किंवा मागे असली काय, आपलं जीवन आपण आपल्या हिमतीवर व निश्चयानेच जगायच असत.....

थोडस महत्वाचं-


1) अन्य जाती-धर्मांवर टिका
करत वेळ वाया घालवू नका.
जे चांगलं असेल त्या गोष्टी
आत्मसात करा.
2) दंगली- मारामारी करुण आपलं
नाव खराब करुण घेऊ नका.
आता लढाईचा काळ
राहिलेला नाही.
3) उच्च शिक्षण तुम्हाला आणि
तुमच्या पुढच्या पिढीला चांगलं
जीवन देऊ शकतं.
4) राजकीय पक्षांचे झेंडे उचलून
गुलामी करू नका.
5) आजचा तरुण एकमेकांना मदत
करुण प्रगती करू शकतो.
त्यासाठी राजकीय पक्षाची वा
नेत्याची गरज नाही.
6) मंदिरात दान करण्याऐवजी
गरीब आणि गरजू तरुणांना
मदत करा. ते तुम्हालाही कधीतरी
मदत करतीलच.
7) चार दिवस सुट्टी काढून कुटुंबा सोबत देवस्थळी, प्रेक्षनीयस्थळी जरुर फिरा पण त्यातला कही वेळ
समाजाच्या प्रगतीसाठी द्या
समाजही तुम्हाला कधीतरी
मदत नक्कीच करेल.
8) इंग्लिश बोलायला शिका.
हा मराठीचा किंवा हिंदीचा अपमान नाही काळाची गरज आहे.
9) व्यायाम, योग, मैडिटेशन करीता स्वतःसाठी दिवसातून तास भर वेळ द्या.
"जगाला काय आवडतं ते करु नका,
तुम्हाला जे वाटतं ते करा,
कदाचित उदया, तुमच वाटणं जगाची "आवड" बनेल.

No comments:

Post a Comment